
ll ॐ ॐकारा गुरुदेव दत्त ll
मठाची थोडक्यात माहिती
श्री क्षेत्र निखरे

भारतातील ऐतिहासिक शहरांपैकी राजापूर या शहरापासून २२ किमी अंतरावर व राजापूर रेल्वे स्टे. पासून अवघ्या ३ किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र निखरे हे छोटेसे खेडे गाव. श्री दत्तगुरु परंपरेतील सदगुरु श्री रामचंद्र योगी महाराजांचे जन्म स्थान, कर्म स्थान व प्रपंचातून परमार्थ साधत इथेच त्यांनी संजीवन जल समाधी घेतली. श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाने व महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परम पावन तपोभूमीला एकदा तरी भेट द्या व महाराजांच्या समाधीला नतमस्तक व्हा ! तुम्हाला महाराजांची दिव्य अनुभूती आल्याशिवाय रहाणार नाही.
गुरुपरंपरा

माणगावचे महान दत्तावतारी श्री वासुदेवांनंद टेंबे स्वामींचे लाडके शिष्य श्री शिवानंद टेंबे स्वामी होते. शिवानंद टेंबे स्वामींचे शिष्य नारायण शेठ होते. शिवानंद स्वामींनी भविष्यवाणी केल्या प्रमाणे नारायणांना गुरुपौर्णिमेच्या सायंकाळी पुत्ररत्नाचा लाभ झाला. हेच ते आपले सदगुरु श्री रामचंद्र महाराज. त्यांना साक्षात श्री दत्तात्रेयांनी दर्शन देऊन गुरुमंत्र दिला. सदगुरु श्री रामचंद्र महाराजांना गुरुदिक्षा रत्नागिरी शिरगावातील श्री शरदचंद्र महाराजांनी दिली. सदगुरु महाराजांचे धाकटे चिरंजीव संतोष यांना दिक्षा सदगुरु श्री रामचंद्र महाराजांनी दिली. हेच आपले सर्वांचे लाडके सदगुरु श्री स्वामी माऊली.
स्वामीकार्य

हातात काम मुखात नाम घेत, प्रपंचातून परमार्थ साधत, घराचेच मंदिर बनवत भक्तांचा उद्धार करत सदगुरु माऊली भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करत रात्रंदिवस अविरत कार्य करत आहेत. अंधश्रधा, बळी परंपरा, वाईट परंपरा यांच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न माऊली करत आहेत. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. अनेक अनाथाश्रमांना, वृद्धाश्रमांना अन्नधान्य, वस्त्र देत आहेत. भविष्यात वेदांसोबत अत्याधुनिक शिक्षण, वेदोक्त संशोधन केंद्र, अत्याधुनिक हॉस्पिटल असे अनेक सामाजिक प्रकल्प निर्माणाचे कार्य हाती घेतले आहे.
आत्मानुभव वर्ग पहिला
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
आत्मानुभव वर्ग पहिला
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
आत्मानुभव वर्ग दुसरा
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
आत्मानुभव वर्ग तिसरा
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
आत्मानुभव वर्ग चौथा
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
योगगुरू वर्ग
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
आत्मानुभव गुरुकुल
सद्गुरु श्री स्वामी माऊलींना सद्गुरु श्री रामचंद्र महाराजांनी दिलेल्या दीक्षेला आज २४ वर्षे झाली आहेत. माऊलींनी भक्तांना नामस्मरण, आसन, प्राणायाम, ध्यान व अध्यात्म साधनेचे योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी कधीच प्रपंचाचा त्याग करायला सांगितला नाही; उलट प्रपंचातूनच परमार्थ साधावा हे शिकवले. त्यांची शिकवण आहे – “हातात काम, मुखात नाम घेऊन घराचेच मंदिर बनवा.” हजारो भक्तांचे जीवन त्यांनी बदलले, प्रपंच सुयोग्य केला व भक्ती जागवली. माऊली सांगतात – आजचे कर्म शुद्ध-सात्त्विक केले तर उद्याचा दिवस सुंदर होतो. खरे गुरु दुर्लभ आहेत; आपले भाग्य थोर आहे की अशा सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभते आहे.

या शतकातील महा निर्माण
श्री दत्तात्रेय
अनघा देवी
भक्ती योग
भक्ती योग हा ईश्वरप्राप्तीचा सहज मार्ग आहे. प्रेम, श्रद्धा व समर्पणाने नामस्मरण, भजन-कीर्तन, पूजन, प्रार्थना व गुरुसेवा यांचा समावेश यात होतो. यात साधक ईश्वराला आपले सर्वस्व मानतो आणि त्याच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवतो. गीतेत भक्ती योग श्रेष्ठ मार्ग मानला आहे. या योगाने अहंकार, लोभ, द्वेष दूर होतात आणि मनात करुणा, समाधान व शांती प्रकट होते. प्रपंचातूनही भक्ती योग साधता येतो.
नाम योग
नाम योग म्हणजे ईश्वराच्या पवित्र नामाचा जप व स्मरण करून साधना करणे. नामस्मरण हे सर्वात सोपे, सहज आणि प्रभावी साधन मानले जाते. यात साधक सतत मंत्र किंवा देवाचे नाव उच्चारत राहतो, ज्यामुळे मन शुद्ध होते, चित्त स्थिर होते आणि अंतःकरणात भक्ती जागते. नामा योगाने अहंकार, भय व दुःख नाहीसे होतात. संतांनी सांगितले आहे – कलियुगात नामस्मरणच ईश्वरप्राप्तीचा सर्वोत्तम व सोपा मार्ग आहे.
ध्यान योग
ध्यान योग म्हणजे मनाला एकाग्र करून आत्म्याशी व परमेश्वराशी जोडणे. यात श्वासावर नियंत्रण, स्थिर आसन आणि अंतर्मुखता यांना महत्त्व आहे. ध्यानाने चित्तशुद्धी होते, विचार-तरंग शांत होतात आणि आत्मिक शांती लाभते. नियमित ध्यान योग साधल्यास तणाव नाहीसा होतो, स्मरणशक्ती वाढते आणि आत्मज्ञान प्रकट होते. गीतेत ध्यान योगाला आत्मसाक्षात्काराचा थेट मार्ग म्हटले आहे.
प्राणायाम व सूर्यनमस्कार
प्राणायाम म्हणजे श्वासाचे नियंत्रण व शुद्धीकरणाची साधना. योग्य प्राणायामाने शरीर निरोगी, मन शांत आणि चित्त एकाग्र होते. हे जीवनशक्ती वाढवणारे साधन आहे. सूर्यनमस्कार हा सूर्यदेवाला अर्पण केलेला संपूर्ण योगाभ्यास आहे. त्यात बारा स्थिती असून शरीराला लवचिकता, ताकद, रक्ताभिसरण सुधारणा आणि ऊर्जा मिळते. प्राणायाम व सूर्यनमस्कार नियमित केल्याने आरोग्य, ताजेतवानेपणा आणि अध्यात्मिक साधनेसाठी बल प्राप्त होते.